Toll ban राज ठाकरे आणि दादा भुसे यांच्यात टोल बंदी संदर्भात बैठक Meeting between Raj Thackeray and Dada Bhuse regarding toll ban 2023

राज ठाकरे आणि दादा भुसे यांच्या टोल वसुली बंद toll ban करण्यासाठी एक बैठक झाली 16 निर्णय

टोल मुळे देशातील तसेच राज्यातील वातावरण खूप ढवळताना दिसत आहे.त्यात मनसेच्या भूमिकेमुळे ते आणखीनच गरम झाले आहे.तोल वसुलीला विरोध म्हणून मनसेने अनेक टोल नाक्यावर आपल्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून तोडफोड केली. त्यांनी अनेक ठिकाणी वाहने,रास्ता रोको केले.त्यामुळे सरकारने राज ठाकरे याना बैठकीसाठी बोलावले आहे. या बैठकी साठी सरकार तर्फे कॅबिनेट मंत्री श्री दादा भुसे व मनसे अध्यक्ष श्री. राज ठाकरे यांची बैठं झाली. राज ठाकरे आणि दादा भुसे यांच्यात झालेल्या बैठकीत विविध मुद्यांवर चर्चा झाली. त्यात खालील 16 मुद्यांवर दोनी पक्षा कढून सहमती दर्शवण्यात आली.

टोल घेतल्यानंतर कोणत्या सोयीसुविधा दिल्या जातील

घेतल्यानंतर कोणत्या सोयीसुविधा दिल्या जातील असा करार कंपन्यांसोबत झाला होता. पण त्या करारातील गोष्टींची अंमलबजावणी झाली नाही असे सध्या दिसत आहे. आता करारातील सर्व उड्डाणपूलांचं ऑडिट केलं जावं, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

मंत्र्या बरोबर झालेल्या बैठकीं नंतर राज ठाकरे यांनी या पत्रकार परिषदेत बोलताना म्हटलं की, सार्वजनिक बांधकाम विभाग 29 आणि MSRDC 15 टोल नाके बंद करण्यासंदर्भात मुख्यमंत्री 15 दिवसांत निर्णय घेतील. तसंच सर्व टोल नाक्यांचे कॅग audit करण्याची मागणी आम्ही केली असून त्यावर मुख्यमंत्री लवकर निर्णय घेतील. याआधी राज ठाकरे यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेत टोलच्या प्रश्नावर पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली होती होती.

“टोल हा महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा घोटाळा आहे. असेही राज ठाकरे म्हणाले टोलचे पैसे नेमके कुणाकडे जातात? हे कुणालाही माहिती नाही आणि विशेष म्हणजे राज्य सरकारवर टोल चालू ठेवण्यासाठी कुणी दबाव आणत आहे का ? हे हि पाहिलं पाहिजे,” असं ठाकरे यांनी म्हटलं होतं. राज ठाकरेंच्या या ( ऑक्टोबरच्या) पत्रकार परिषदेच्या दोन दिवस आधीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टोलबाबत एक घोषणा केली होती.

फडणवीस यांनी म्हटलं होतं की, “राज्यातल्या सगळ्या टोलवर चारचाकी आणि छोट्या गाडयांना टोलमुक्ती दिलेली आहे, व्यावसायिक वाहनांवरच आम्ही टोल आकारतो.”

त्यानंतर महाराष्ट्रात खरोखर वाहनांवर टोल आकारला जातो की नाही यावर चर्चा सुरु झाल्या.

टोल टॅक्स का लावला जातो?

सरकारकडून टोल टॅक्स का ? घेतला जातो याची अनेक कारणे आहेत; जसे की- रस्ते करण्यासाठी झालेल्या खर्चाची भरपाई करण्यासाठी सरकारकडून टोल लावला जातो. हा टोल टॅक्स चारचाकी किंवा कार, ट्रक, बस अशा मोठ्या वाहनांकडून वसूल केला जातो. हा टोल टॅक्स रस्त्यांच्या बांधकाम आणि देखभालीसाठी वापरला जातो.

आजकाल टोल टॅक्स फास्टॅगद्वारे किंवा रोख रकमेद्वारे आकारला जातो. जे लोक राष्ट्रीय महामार्ग, बोगदे, द्रुतगती मार्ग आणि इतर मार्ग त्यांच्या वाहनांनी प्रवास करतात. त्यांच्याकडून सरकार टोल कर वसूल करते. देशातील राष्ट्रीय महामार्गांचे बांधकाम आणि व्यवस्थापन भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) द्वारे केले जाते.

त्या बैठकीत काही निर्णय घेण्यात आले ते 16 निर्णय खालील प्रमाणे आहेत

  • फास्टँग नाही तर एकदाच पैसे भरावे लागतील.
  • टोल नाक्यावरील बोर्डावर रोजच्या वसुलीचा आकडा दिसणार.
  • आनंदनगर टोल नाक्यावरून एरोलीला जाणाऱ्यांना एकदा टोल भरावा लागणार.
  • मुलुंडच्या हरी ओम नगर परिसरातील लोकांसाठी पूल बांधला जाईल.
  • पंधरा दिवसात सर्व एन्ट्री पॉईंट वर सरकार सीसीटीव्ही लावणार.
  • टोल नाक्यावर पुरुष व स्त्रियांसाठी स्वच्छ प्रसाधन गृह असेल.
  • प्रवाशांसाठी टोल नंबर दिला जाईल.
  • सर्व उड्डाण पूल आणि भुयारी मार्गाचा स्ट्रक्चरल ऑडिट होणार.
  • ठाण्यात चार चाकीना करण्यात आलेली पाच रुपयांची दरवाढ महिनाभरात रद्द.
  • येलो लाईनच्या 200 ते 300 मीटरच्या पलीकडील वाहनांना टोल न घेताच सोडणार.
  • टोल नाक्यावर चार मिनिटाच्या पलीकडे एकही गाडी थांबणार नाही.
  • टोल नाक्यावर पोलीस तैनात करणार बाऊन्सर ठेवणार नाही.
  • चांगल्या रस्त्यासाठी महापालिका केंद्र सरकार आणि राज्य सरकारची बैठक होणार.
  • पीडब्ल्यूडी चे 29 एम एस आर डी सी चे 15 जुने टोलनाके बंद toll banकरण्याचा निर्णय महिनाभरात.

राज ठाकरे आणि दादा भुसे यांच्या टोल वसुली बंद toll ban करण्यासाठी एक बैठक झाली त्या बैठकीत वरील निर्णय घेण्यात आले ते 16 निर्णय झाले सरकारने ते लवकरात लवकर अमलात आणावे असे राज ठाकरे यांनी सांगितले.

तुम्हाला जर आमची माहिती आवडली असेल व अश्या प्रकारच्या माहिती आपणाला हवी तर आमच्या तरुण विचार या व्हाट्सअप्प चॅनल फेसबुक पेज ला नक्की follow, लाईक नक्की करा.

Leave a Comment