Onion Storage : लासलगाव येथे कांदा साठवणूक चाचणी यशस्वी

Onion

Onion Storage : सध्या चर्चेचा विषय म्हणजे कांदा Onion हा किती जणांना रडवणार आणि किती जणांना हसवणार कारण ज्यास्त तर कांद्याचा गुणधर्मच आहे रडवणे, कधी तो शेतकऱ्यांना रडवतो तर कधी ग्राहकांना, एवढंच नाही तर वेळ प्रसंगी सरकारला हि रडवण्याची ताकत कांदा ठेवतो. आता तुम्ही म्हणाल कि कांदा सरकारला कसा काय रडवू शकतो बुवा ! हो हे खरं आहे कारण मागील काही वर्षात कांद्याने अनेकांची सरकारे पडली आहेत.

त्यामुळे कांद्याला सर्वजणच भितात या मागचा कारणही तसेच आहे. शेतकरी कष्ट आणि आर्थिक रसद पुरवून कांदा जोपासतात. परंतु त्याला भाव लागेल का नाही या भीतीने शेतकरी भितो. तर ग्राहक कांद्याचे भाव वाढतील या भीतीत असतात. तर सरकार भाव वाढी मुळे नागरिक आणि ज्यास्त तर न्युज वाले त्याचा आव वि भाव करतील या भीतीत सरकार असत.

कारण कि कांदा हा जगात सर्वात ज्यास्त वापरले जाणारा पदार्थ आहे. पण कांदा हा ज्यास्त काळ टिकवून ठेवता येते नाही या मुळे शेतकऱ्याचे नसून मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. त्यामूळचे कांद्याच्या भावात समतोल राहताना दिसत नाही. कांदा हा उष्ण पदार्थ आहे. त्यामुळे त्याची साठवनु ज्यास्त काळ एका ठिकाणी करता येत नाही.

याच्यावर काय उपाय करता येतील असा जर तुम्ही विचार करत असाल तर शिव बातमी नक्कीच तुमच्या साठी महत्वाची आहे. कारण आताच आलेल्या माहिती नुसार कांदा ज्यास्त काळ टिकाव यासाठी अनेक प्रयोग करण्यात आले होते. त्यात यश आले आहे.

Onion Storage :

कांदा साठवुणुकी साठी या पद्धतीचा वापर केला जाऊ शकतो. होय रेडिएशन मुळे कांदा ज्यास्त काळ टिकू शकतो. या साठी कांदा काढणीनंतर एक महिन्याच्या आता प्रक्रिया करावी लागते. या मुळे सहा ते सात महिने कांदा ठेवता येतो.

 ‘‘कांदा दर स्थिर करणासाठी व कांदा संरक्षणासाठी व कांदा उत्पादकासाठी ‘कृषक’चे नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान हे क्रांतिकारक पाऊल आहे,’’ असे वक्तव्य अणुऊर्जा विभागाचे सचिव व अध्यक्ष डॉ. अजितकुमार मोहंती यांनी लासलगाव येथे शुक्रवारी आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात केले.

‘कृषक’च्या परिसरात झालेल्या या मेळाव्यास भाभा अणुसंशोधन केंद्राचे संचालक “विवेक भसीन” यांच्यासह माजी संचालक “डॉ. घंटी”, फूड टेक्नॉलॉजीचे मुख्य “डॉ. सत्येंद्र गौतम”, अनुजा केंद्राच्या सह सचिव “सुषमा शेटे”, महाराष्ट्र राज्य कृषी अधिकारी “बालकृष्ण सूर्यवंशी”, ‘डायरेक्टर ऑफ इन्फ्रा कुल’चे “संजय गुप्ता”, प्रांताधिकारी “हेमांगी पाटील” आदी मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

तज्ज्ञाची मते

मोहंती बोलताना असे म्हणाले की, ‘कृषक’ मधील संवर्धन चाचण्या यशस्वी करणे हे अन्न संरक्षणाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल आहे.’’

शेटे म्हणाल्या,‘‘रेडिएशनमुळे कांद्याचे आयुष्य वाढते. या साठी कांदा काढणीनंतर एक महिन्याच्या आत प्रक्रिया करावी लागते, यासाठी सहा ते सात महिने ठेवावे लागतात. ही प्रक्रिया प्रामुख्याने खाद्यपदार्थसाठी उपयोगी आहे. आंब्यावर विकिरण प्रक्रिया केल्यानंतर अमेरिका व ऑस्ट्रेलिया या ठिकाणी पाठविला जातो. त्याचा शरीरावर कोणताही परिणाम होत नाही. कांदा उत्पादकांसाठी पायलट प्रोजेक्ट ‘कृषक’ मध्ये सुरू केला आहे. त्यात प्रायोगिक तत्त्वावर 250 टन कांदा मोफत प्रक्रिया करून मिळेल. यासाठी स्टोरेज खर्च प्रतिएक महिना एक किलो साठी एक रुपया व रेडिएशन खर्च एक रुपये व इतर खर्च असे साडेसहा रुपये खर्च येतो. या प्रक्रियेतून गेलेला कांदा शेतकऱ्यांचा हातात 97 टक्के मिळतो.’’

अनुजा केंद्राच्या सह सचिव “सुषमा शेटे

‘कांदा संरक्षण हाच हेतू’

कांदा संरक्षणासाठी भाभा आणू संशोधन केंद्राच्या नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाचे कांदा बाजार भावाच्या स्थिर करण्यासाठी साठी महत्त्वपूर्ण योगदान आहे. लासलगाव येथे कृषी युनिटमध्ये ही चाचणी यशस्वी झाली आहे हे या वेळी सांगण्यात आले. त्यानंतर शेतकरी आणि शेतकरी उत्पादक संस्थांपर्यंत पोहोचण्यासाठी हा मेळावा घेण्यात आला होता. मंदीच्या काळात कांद्याची कमतरता, वजन कमी होणे, कुजणे, मोड येणे आदी समस्या टाळण्यासाठी विकिरण केलेले कांदे साडे सात महिने चांगल्या स्थितीत साठवू शकतो, असे या वेळी सांगण्यात आले आहे.

शेतकऱ्यांना कांदा साठवण्या साठी बऱ्याच अडचणी येत होत्या. परंतु या संशोधनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपला कांदा ठीकवणे व त्या कांद्याला योग्य भाव आल्यास बाजार पेठेत पाठवणे शक्य होणार आहे. नक्कीच हि प्रक्रिया थोडी खर्चिक आहे परंतु यातून शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होईल. अशी अपेक्षा आहे. या साठी हे संशोधन लवकरात लवकर शेतकऱ्या पर्यंत पोहचवणे सरकारची जिम्मेदारी आहे.

कांदा साठवणुकीचे करा नियोजन

कांदा साठवण चाळ बांधताना जागेची निवड महत्त्वाची असते. चाळीसाठी उंचावरची व पाणी न साठणारी जागा निवडावी लागते . चाळीची उभारणी दक्षिण-उत्तर अशी करावी. चाळीची लांबी 50 फुटांपेक्षा जास्त असू नये.

कांदा काढणीनंतर कितीही व्यवस्थित सुकवला तरी कांद्यामधून पाण्याचे उत्सर्जन होत असल्यामुळे वजनात घट येते. ही घट कांद्यामध्ये जातीपरत्वे 25 ते 30 टक्के असते. कांदा काढणीनंतर तो चांगला सुकवला नाही तर वरचा पापुद्रा चांगला वाळत नाही. वरचे कवच ओलसर राहिले तर कांदा सडतो. कांद्याची सड विशेषतः जुलै ते ऑगस्ट या दरम्यान जास्त होते. सडीमुळे कांद्याचे या काळात 10 ते 15 टक्के नुकसान होते.

कोंब येणे – कांदा काढणीसाठी तयार झाला असता त्याची मान मऊ होते आणि पात आडवी होते. या काळात पानातील ऍबसेसिक ऍसिड कांद्यामध्ये उतरते. हे रासायनिक द्रव्य कांद्याला एक प्रकारची सुप्त अवस्था प्राप्त करून देते. रब्बी कांद्याच्या माना व्यवस्थित पडतात. रब्बी कांदा काढणीनंतर लगेच कोंब न येता टिकतो; परंतु खरिपातील किंवा रांगड्या हंगामातील कांद्याच्या माना पडत नाहीत. कांदा तयार झाला तरी त्याची वाढ चालू असते. नवीन मुळे आणि कोंब येत असतात. कोंब येण्यामुळे जातीपरत्वे 10 ते 15 टक्के नुकसान होते.

कांदा सुकवणे

  1. काढणीनंतर कांदा शेतातच पातीसह सुकू द्यावा. कांद्याच्या ओळी अशा तऱ्हेने लावाव्यात की जेणेकरून पहिल्या ओळीतील कांदा दुसऱ्या ओळीतील पाल्याने झाकला जाईल. अशा प्रकारे कांदा शेतात चार दिवस सुकू द्यावा. नंतर चार सें.मी. लांब मान ठेवून पात कापावी.
  2. चिंगळी, जोड कांदा व डेंगळे आलेले कांदे वेगळे काढावेत. राहिलेला कांदा सावलीत ढीगकरून 15 दिवस सुकवावा. त्यामुळे कांदे चांगले टिकतात.
  3. कांद्याची निवड योग्य केली तर आपणास साठवणूक करणे सोपे होते. कारण योग्य साईजचा कांदा चांगला पिकलेला असतो. त्यामुळे कांद्याची योग्यनिवड करणे व त्याची साठवनु वेगवेगळ्या ठिकाणी करणे गरजेचे असते.
  4. कांदा पूर्ण पक्ल्या नंतरच काढला जावा. काढण्यानंतर कांदा काही काळ सावलीत ठेवणे गरजेचे आहे. कारण कांदा गरम असल्याने तो लगेच चाळीत टाकला किंवा त्यावर प्रक्रिया केली तर कांदा ज्यास्त काळ टिकणार नाही. त्यामुळे त्याला थंड परंतु कोरड्या वातावरणात ठेवणे आवश्यक आहे.
  5. सुकलेल कांदा प्रक्रियेसाठी व साठवणुकीसाठी योग्य असतो. याची सर्व कांदा साठवणूक व उत्पादक शेतकऱ्यांनी काळजी घेणं गरजेचं असत.

कांदाचाळ

  1. कांदा साठवण चाळ बांधताना जागेची निवड महत्त्वाची असते. चाळीसाठी उंचावरची आणि पाणी न साठणारी जागा निवडावी. तळाशी मुरूम व वाळूचा थर द्यावा. त्यानंतर चाळीची उभारणी करावी. तळाशी दोन फुटांची मोकळी जागा ठेवावी.
  2. चाळीची उभारणी दक्षिण-उत्तर अशी करावी. साठवणगृहाची लांबी 50 फुटांपेक्षा जास्त असू नये. पाखीची रुंदी चार फुटांपेक्षा जास्त असू नये. तळाशी हवा खेळती असावी. बाजूच्या भिंतीदेखील लाकडाच्या किंवा बांबूच्या असाव्यात, त्यात फटी असाव्यात.
  3. चाळीच्या खालच्या मोकळ्या जागेतून रात्री थंड हवा चाळीत शिरते, गरम हवा चाळीच्या वरच्या त्रिकोणी भागात जमा होते. रात्री चाळीचे दरवाजे उघडे ठेवले तर वाऱ्याच्या झुळकेसोबत गरम हवा बाहेर काढली जाते.
  4. चाळीचे छप्पर उसाच्या पाचटाने झाकावे. कौले महाग पडतात, चाळीचा खर्च वाढतो. सिमेंट पत्रे व त्यावर उसाच्या पाचटाचे आच्छादन केले तर तापमान कमी राहण्यास मदत होते.
  5. चाळीचे छप्पर उतरते असावे. ते उभ्या भिंतीच्या तीन फूट पुढे आलेले असावे, त्यामुळे पावसाचे ओसडे कांद्यापर्यंत पोचत नाहीत, कांदा खराब होत नाही.

कारण यामुळे सरकारला कांद्याचे भाव स्थिर ठेवणे शक्य होणार आहे. व शेतकऱ्यांना याचा फायदा होईल.

Leave a Comment