Lokmanya Tilak Award : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक पुरस्कार

Lokmanya Tilak Award नक्की काय आहे? का आणि कधी झाली याची सुरुवात ?

Lokmanya Tilak Award देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रातील पुण्यात दौऱ्यावर येणार आहेत. येथे त्यांना लोकमान्य टिळक पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रातील पुण्यात दौऱ्यावर येणार आहेत. येथे त्यांना लोकमान्य टिळक पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. आयोजकांनी या पुरस्काराबद्दल आधीच सांगितले होते की, हा पुरस्कार त्यांच्या सर्वौच्च नेतृत्वासाठी दिला जाणार आहे. मात्र तुम्हाला या पुरस्काराबद्दल अधिक माहतेय का? याच बद्दल आपण अधिक जाणर घेणार आहोत. 

पीएम मोदी यांना दिल्या जाणाऱ्या या पुरस्काराची सुरुवात 1983 मध्ये टिळक स्मारक मंदिर ट्रस्ट द्वारे करण्यात आली होती. हा प्रतिष्ठीत पुरस्कार ट्रस्ट द्वारे प्रत्येक वर्षी लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त दिला जातो. बाळ गंगाधर टिळक म्हणजेच लोकमान्य टिळक हे २० व्या शतकाताच्या सुरुवातीला भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील एक प्रमुख व्यक्ती होते.

का दिला जातोय हा पुरस्कार

बाळ गंगाधर टिळक हे भारतीय स्वराज्याचे प्रबळ समर्थक होते आणि त्यांनी जनतेला संगठीत करण्यासाठी फार महत्त्वाचे योगदान दिले. ट्रस्ट असे म्हणते की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या अनन्यसाधारण नेतृत्व आणि नागरिकांमध्ये देशभक्तीच्या भावनेला प्रोत्साहन देण्याच्या त्यांच्या या प्रयत्नांमुळे त्यांना हा पुरस्कार दिला जात आहे.

ट्रस्ट मध्ये कोण कोण आहेत?

संस्थेचे अध्यक्ष लोकमान्य यांचे पणतू दीपक टिळक आहेत. टिळक हे परंपरांगत रुपात काँग्रेस समर्थक होते. लोकमान्य यांना असे व्यक्ती मानले जाते की, ज्यांनी काँग्रेसला जनतेपर्यंत पोहचवले. दीपक टिळक यांचे वडिल जयंतराव टिळक, ज्यांनी हिंदू महासभेची सुरुवात केली होती. 1950 च्या दशकात ते काँग्रेसमध्ये गेले आणि राज्यसभेचे खासदार आणि महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे अध्यक्ष झाले.

गेल्या वर्षी म्हणजेच 2022 मध्ये लोकमान्य टिळक पुरस्कार हा भारताच्या मिसाईल वुमन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जेष्ठ शास्रज्ञ टेसी थॉमस यांना दिला गेला होता. त्यांनी अग्नि-4 आणि अग्नि-5 क्षेपणस्र प्रणालींसाठी प्रकल्प संचालक म्हणून काम केले होते आणि देशाच्या संरक्षण क्षमतेत त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले होते.

पीएम मोदी यांच्याआधी हा पुरस्कार माजी राष्ट्राध्यक्ष डॉ. शंकर दयाल शर्मा आणि प्रणब मुखर्जी, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी, इंदिरा गांधी आणि मनमोहन सिंह यांना दिला गेला होता. या व्यतिरिक्त प्रसिद्ध व्यावसायिक एन. आर. नारायणमुर्ती आणि मेट्रो मॅन ई. श्रीधरन यांना पुरस्कार दिला गेला होता.

पीएम नरेंद्र मोदी

नरेंद्र दामोदरदास मोदी (जन्म : 17सप्टेंबर 1950) हे भारतीय जनता पक्षाचे (भाजपचे) नेते आणि मे 26 इ.स. 2014 पासून स्वतंत्र भारताचे 15 वे पंतप्रधान आहेत. ते ऑक्टोबर 7, इ.स. 2001 पासून मे 22, इ.स. 2014 पर्यंत गुजरात राज्याचे मुख्यमंत्री होते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर जन्मलेले ते भारताचे पहिले पंतप्रधान आहेत. भाजपच्या गुजरात विधानसभेच्या 2002 ते 2012 च्या तसेच 1995 च्या व 1998 च्या निवडणूक विजयांमध्ये मोदींचे मोठे योगदान होते.

ते 2001 च्या ऑक्टोबर मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री झाले व त्यानंतर सरळ 4 विधानसभा जिंकत मोदींनी मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार पाहिला. 2009 लोकसभा निवडणुकीसाठीही ते भाजपचे कूटनीतिज्ञ होते. मोदी हे हिंदुत्ववादी विचारसरणीचे नेते आहेत व संघाचे स्वयंसेवक आहेत. मोदी हे गुजरात राज्याच्या विकासासाठी ओळखले जातात. त्यांच्या अर्थकारणाची प्रशंसा सर्वत्र केली जाते. परंतु 2002 च्या दंगलीत त्यांच्या भूमिकेबद्दल आक्षेप घेतले गेले होते.

लोकमान्य टिळक

बाल गंगाधर टिळक -मूळ नाव केशव गंगाधर टिळक, 23 जुलै 1856 – 1 ऑगस्ट 1920 ), हे भारतीय राष्ट्रवादी, शिक्षक, समाजसुधारक, वकील आणि स्वातंत्र्यसैनिक म्हणून त्यांची ओळख आहे. भारतीय स्वतंत्र संघाच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी भारतीय स्वतंत्रांसाठी नवीन कल्पना ठेवल्या आणि अनेक गोष्टी करून पाहिल्या इंग्रजांनी त्यांना “भारतीय असंतोषचे जनक” असे म्हटले त्याला “लोकप्रिय” ही आदरणीय पदवी देखील मिळाली, ज्याचा अर्थ “लोकांनी त्यांना भारतीय स्वातंत्र्याचा नायक म्हणून स्वीकारले.

लोकमान्य टिळक हे स्वराजाच्या पहिल्या आणि नामंकित वकिलांपैकी एक होते. ते भारतीय विवेकामध्ये एक मजबूत कट्टरपंथी परिवर्तनवादी म्हणून त्यांची ओळख आहे. “स्वतंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. आणि तो मी मिळवणारच” (स्वराज हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि मी त्याच्याबरोबर राहीन) ही त्यांची मराठी भाषेतील घोषणा खूप प्रसिद्ध झाली होती. त्यांनी बिपिन चंद्र पाल, लाला लजपत राय, अरविंद घोष आणि चिदंबरम पिल्लई इत्यादींसोबत भारतातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस फॉर स्वराजच्या अनेक नेत्यांसोबत जवळून सहकार्य केल आहे .

आमचे सोशल मीडिया

tarunvichar चे facebook चॅनल

tarunvichar चे whatsapp चॅनल

तुम्हाला जर आमची माहिती आवडली असेल व अश्या प्रकारच्या माहिती आपणाला हवी तर आमच्या तरुण विचार या व्हाट्सअप्प चॅनल व फेसबुक पेज ला नक्की follow, लाईक नक्की करा.

Leave a Comment