Insurance तुम्ही भरला का 1 रुपयात पीक विमा

Insurance एक रुपयात पिक विमा

महाराष्ट्रामध्ये सततच्या अवकाळी पावसामुळे, कधी अति पावसामुळे, तर कधी पावसाच्या खंडामुळे, शेतकऱ्यांचे जे नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या उत्पन्नामध्ये कमालीची घट आढळून आली आहे. त्यामुळे शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती बिकट होत आहे. शेतकऱ्याला विमा भरण्यासाठी ही पैशाची अडचणी येत असल्याचे लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी “एक रुपयात पिक विमा” या योजनेची सुरुवात केलेली आहे.

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच तत्कालीन अर्थमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीचा विचार करून व जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा यासाठी “एक रुपयात पिक विमा” ही संकल्पना समोर आणली. नैसर्गिक आपत्ती सारख्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकाचे नुकसान होते. या नुकसानीपासून शेतकऱ्यांचे संरक्षण करण्यासाठी एक रुपयात पंतप्रधान पिक विमा योजना कृषी विभागामार्फत राबविण्यात येत आहे.


खरीप हंगामा प्रमाणेच रब्बी हंगामातही शेतकऱ्यांना एक रुपयात पिक विमा मिळणार आहे शेवटची तारीख काय आहे.

रब्बी हंगाम


          खरीप हंगामा प्रमाणे रब्बी हंगामातील पिकांना ही एक रुपयात विमा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी पंतप्रधान पिक विमा योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. मागील वर्षी रब्बी हंगामात 7.5 लाख शेतकऱ्यांनी जवळ जवळ 5.5 लाख हेक्टर वरील रब्बी पिकाचा एक रुपयात विमा उतरविला होता. तसेच 2023 मधील खरीप हंगामात 1 कोटी 96 लाख शेतकऱ्यांनी 1 कोटी 12 लाख हेक्टर वरील पिकाचा विमा उतरवला होता. सलग दोन हंगामात पिक विमा योजनेला मिळालेल्या उदंड प्रतिसादामुळे 2023 मधील रब्बी हंगामात पिक विमा काढण्यासाठी शेतकऱ्यांकडून खूप मोठा प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा शासनाला आहे.

हेही वाचा -Pikvima पुढील आठवड्यात अग्रिम विमा मिळणार..!

पीक विमा कशा साठी दिला जातो

आपण शेतामध्ये पीक पेरणी केल्यानंतर ते काढणीपर्यंत जर पिकाची नैसर्गिक आपत्ती होऊन शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले. याचा परिणाम त्यांच्या कुटुंबावर, उदरनिर्वाह,तसेच त्यांनी काढलेले कर्ज फेडण्यासाठी, त्यांच्या आर्थिक अडचणी सोडविण्यासाठी, तसेच पुढील हंगामातील पेरणी करण्यासाठी, ही आर्थिक जुळवा जुळव करताना शेतकऱ्यांना अडचण येते. अशा संकट समई शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी केंद्र सरकार तर्फे राबविण्यात येणाऱ्या पंतप्रधान पिक विमा योजना ही महत्त्वाची ठरते. हा पिक विमा पीक पेरणी पासून काढणीपर्यंतच्या कालावधीत गारपीट, अतिवृष्टी, महापूर, चक्रीवादळ व पावसातील खंड इत्यादी नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचे नुकसान होते, त्यासाठी पिक विमा दिला जातो.

या योजनेसाठी कोण अर्ज करू शकतात


1)अर्ज करण्यासाठी सर्वात महत्त्वाची आठ म्हणजे त्या व्यक्तीच्या नावावर जमीन असली पाहिजे.

2) तो महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे.

3) कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना एक रुपयात नोंदणी करता येते नेतृत्व शेतकऱ्याचा विमा हप्ता राज्य सरकार भरतो.

पिकाला विम्याचे संरक्षण

राज्यातील मागील रब्बी हंगामात 50000 हजाराउंन अधिक शेतकऱ्यांना 18 कोटी 10 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आली होती.यंदा पावसाने ओढ  दिली असल्यामुळे खरीप हंगामात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी पिकांचे उत्पादन घटले असून त्या बदल्यात विमा कंपन्यांकडून 25% आगाऊ भरपाई दिली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर यंदा रब्बी हंगामातील पिकांसाठी विम्याचे कवच घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल अधिक असेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

विमा भरण्याची अंतिम मुदत किती?

पिक विमा योजनेतील रब्बी हंगामातील ज्वारीसाठी नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत, तर बागायती गहू, हरभरा, रब्बी कांद्यासाठी, 15 डिसेंबर तसेच उन्हाळी भात व भुईमूग पिकासाठी 31 मार्च 2024 पर्यंत शेतकऱ्यांना पिक विमा भरता येईल.

हेही वाचा -महाराष्ट्रातील या 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर

विमा भरण्यास जास्त पैसे घेतल्यास कोठे तक्रार करावी

तुम्ही पिक विमा भरत असाल तर तुम्हाला एक रुपयाच्या वर कोठेही अतिरिक्त पैसे देण्याची गरज नाही. कारण योजनेत सहभागी होण्यासाठी किंवा अर्ज करण्यासाठी प्रत्येक सीएससी धारकाला किंवा विमा भरणाऱ्या व्यक्तीला विमा कंपन्यामार्फत प्रत्येक अर्जासाठी चाळीस रुपये देण्यात येतात.

त्यामुळे शेतकऱ्यांनी सीएससी केंद्र धारकाकडून केवळ एक रुपया भरून या योजनेत सहभागी व्हावे. कर्जदार शेतकऱ्यांनी बँकेमार्फत विहित नमुन्यात अर्ज भरून देणे आवश्यक आहे. तसेच कर्जदार शेतकरी योजनेत सहभागी होणार नसल्यास त्याने बँकेला लेखी कळविणे गरजेचे आहे. पिक विमा भरताना काही अडचणी आल्यास किंवा अर्ज भरण्यासाठी केंद्र चालकाकडून अतिरिक्त पैशाची मागणी केल्यास पीक विमा कंपन्यांचे कार्यालय, जवळची बँक, तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी, जिल्हाधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कार्यालयाशी संपर्क साधून तेथे तक्रार करावी.

“राज्य सरकारकडून सर्व समावेशक पीक विमा योजना राबविण्यात येत असून त्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या आयुष्याची विमा रक्कम सरकार भरणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना केवळ एक रुपयात या योजनेत सहभागी होता येणार आहे.”

दिलीप झेंडे, कृषी संचालक विस्तार व प्रशिक्षक

हेही वाचा -Pikvima पुढील आठवड्यात अग्रिम विमा मिळणार..!

ऑनलाइन अर्ज कसा करायचा?

  • पिक विमा योजनेत तुम्ही स्वतः ऑनलाईन अर्ज करू शकता त्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला pmfby.gov.in या वेबसाईटवर जाऊन ती ओपन करायचे आहे.
  • त्यातील Farmer Application या पर्यायावर क्लिक करायचं आहे.
  • त्यानंतर Guest Farmer या पर्यायावर क्लिक करायचा आहे.
  • आता नवीन शेतकरी म्हणून नोंदणी करायची आहे.
  • इथे सुरुवातीला शेतकऱ्यांची माहिती टाकायची आहे. यात शेतकऱ्यांचे पूर्ण नाव रिलेशनशिप मध्ये अर्जदार कुणाचा मुलगा मुलगी पत्नी आहे. ते निवडायचे आहे मग पती किंवा वडीलयांचा नाव टाकायचा आहे.
  • मोबाईल नंबर टाकून verify वर क्लिक करायचं आहे. त्यानंतर स्क्रीनवर एक captcha कोड दाखवला जाईल तो टाकून Get OTP  क्लिक करायचा आहे.
  • मोबाईलवर आलेला ओटीपी टाकून submit वर क्लिक करायचा आहे.
  • याच्यानंतर व्हेरिफिकेशन Success झाल्याच तुम्हाला तिथे दिसेल यानंतर वय, जात किंवा प्रवर्ग, लिंग निवडायचं आहे.
  • आता Farmer type मध्ये शेतकऱ्याचा प्रकार अल्पभूधारक, अत्यल्पभूधारक आहे, का ते निवडायचा आहे.
  • Farmer category मध्ये अर्जदार जमिनीचा मालक आहे का भाडेपट्टा करार आहे ते निवडायचा आहे.
  • यानंतर पत्याविषयीची माहिती भरायची आहे.
  • आता राज्य, जिल्हा, तालुका, गाव, निवडायचा आहे. पुढे सविस्तर पत्ता टाकून पिन कोड टाकायचा आहे.
  • यानंतर Farmer ID मध्ये UID निवडायचा आहे मग आधार नंबर बरोबर टाकायचा आहे. आणि Verify वर क्लिक करायचा आहे.
  • स्क्रीनवर व्हेरिफिकेशन success झाल्याचा मेसेज दिसेल.
  • पुढे बँक खात्याचा तपशील भरायचा आहे. बँकेचा IFSC कोड माहिती असेल तर YES आणि नसेल तर NO या पर्यावरण करायचा आहे.
  • मग राज्य जिल्हा बँकेचे नाव शाखा निवडायचे आहे शाखा निवडली की त्याच्यासमोर IFSC कोड आपोआप आलेला दिसेल.
  • पुढे बँक खात्याचा नंबर टाकायचा आहे. तो पुन्हा एकदा टाकून कन्फर्म करायचा आहे.
  • खाली दिलेला captcha कोड टाकून Create User पर्यायावर  करायचा आहे.
  • यानंतर तुम्ही भरलेली माहिती तुम्हाला दाखवली जाईल. ती व्यवस्थित वाचून Next वर क्लिक करा.
  • पुढे तुम्हाला तुमच्या बँक खात्याचा तपशील दिलेला दिसेल. त्यापैकी एक खाते तुम्हाला निवडायचे आहे आणि Next वरती क्लिक करायचे आहे.
  • आता पिक विमा योजना आणि क्षेत्रासंबंधी माहिती भरायची आहे
  • महाराष्ट्र राज्यावर क्लिक करून समोर योजनेचे नाव प्रधानमंत्री फसल विमा योजना निवडायचं आहे. त्यानंतर तिथं खरीप सीजन रब्बी सीजन आणि वर्ष निवडायचा आहे.
  • Land Details  मध्ये पिकाची माहिती द्यायची आहे. इथल्या वर्तुळावर क्लिक केलं की खाली तुम्ही ती माहिती भरू शकत.
  • जर तुम्ही मूग सोयाबीन कापूस असं एकापेक्षा जास्त पिकांसाठी विमा भरणार असाल तर mix cropping ला yes करायचं आहे. पण एकाच पिकाचा विमा भरणार असाल तर no करून एक एक निवडायचा आहे.
  • पुढे पेरणी ची तारीख निवडायची आहे. त्यानंतर खाते क्रमांक आणि गट क्रमांक टाकायचा आहे पुढच्या Verify पर्यावर क्लिक करायचा आहे.
  • मग स्क्रीनवर तुमच्या नावावर किती क्षेत्र आहे. याची माहिती दाखविली जाईल.
  • इथल्या वर्तुळा वर क्लिक करून तुमचं क्षेत्र आधीच insured आहे. की नाही ते बघायचं आहे. मग submit वर क्लिक करायचं आहे.
  • इथे तुम्ही  Insured Area  मध्ये तुम्हाला जेवढ्या क्षेत्राचा विमा भरायचा आहे. तेवढे क्षेत्र लिहू शकता. त्यानुसार विमा ची रक्कम कमी जास्त होते.
  • पुढे त्या क्षेत्रासाठी तुम्हाला किती हप्ता भरावा लागेल. ते  farmer shares मध्ये दाखवलं जाईल. आता इथे कितीही रक्कम दिसत असली तरी शेवटी पेमेंट करताना तुम्हाला एक रुपयाच भरावा लागणार आहे. इथल्या  next पर्यायावर क्लिक करायचं आहे.
  • आता तुम्हाला कागदपत्र अपलोड करायची आहेत
  • बँक पासबुक फोटो upload करायचा आहे. त्यानंतर नुकताच काढलेला डिजिटल सही चा सातबारा उतारा आणि आठ अ उतारा एकच पीडीएफ फाईल मध्ये घेऊन अपलोड करायचा आहे.
  • शेवटी पीक पेऱ्याची घोषणापत्र अपलोड करायचा आहे. याचा फॉरमॅट नेटवर तुम्हाला कुठेही उपलब्ध होईल. तो फॉरमॅट साध्या कागदावर लिहून अपलोड करायचा आहे.
  • तिनी फोटो upload करून झाले की तिन्ही समोरच्या upload पर्यावर क्लिक करायचं आहे. मग तिथे तिन्ही फोटो upload करण्यात आले. असं success म्हणून दाखवलं जातं.
  • Next वर क्लिक केलं की शेतकऱ्यांची बँक खात्याची व पिकाची माहिती दाखविली जाईल. किती किती रक्कम भरायचे ते दाखवलं जाईल, इतर SUBMIT  वर क्लिक करायचं आहे.
  • यानंतर तुमच्या मोबाईलवर एक मेसेज पाठवला जाईल, या तुमचा अर्ज क्रमांक विम्याची रक्कम याची माहिती नमूद केलेली असेल.
  • आता पेमेंट करायचा आहे इथं तुम्हाला एक रुपयाचं पेमेंट करायचा आहे. ते पेमेंट तुम्ही डेबिट कार्ड इंटरनेट बँकिंग यूपीआय क्यू आर कोड वापरून करू शकता.
  • पेमेंट झालं की शेतकरी अर्जाची पावती तुम्हाला मिळेल.
  • इथं खाली असलेल्या  Print Policy Receipt पर्यावर क्लिक करून पिक विमा योजने सहभागाची पावती तुम्हाला uploadकरता येईल.
  • अशाप्रकारे तुम्ही स्वतःहून पिक विमा योजनेसाठी अर्ज करू शकता.

हेही वाचा -PM Kisan योजनेची लाभार्थी यादी येथे तपासा आपले नाव

तुम्हाला जर आमची माहिती आवडली असेल व अश्या प्रकारच्या माहिती आपणाला हवी तर आमच्या तरुण विचार या व्हाट्सअप्प चॅनल व फेसबुक पेज ला नक्की follow, लाईक नक्की करा.

Leave a Comment