PM Kisan योजना हे काम लवकर करा अन्यथा मिळणार नाही 15 वा हप्ता

PM Kisan चा १५ हप्ता मिळण्यापूर्वी शेतकऱ्यांना काही महत्वाची कामे करावी लागणार आहेत. अन्यथा शेतकरी या हप्त्यापासून वंचित राहू शकतात.

PM Kisan Samman Nidhi Yojana

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपये दिले जातात. हे पैसे शेतकऱ्याना तीन टप्यात 2000 रु चा एक हप्ता या प्रमाणे बँक खात्यात जमा केले जातात. आता पर्यंत भारत सरकार म्हणजे नरेंद्र मोदी सरकारने 14 हप्ते शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा केले आहेत.आत 15 वा हप्ता कधी मिळणार अशी चर्चा आहे.परंतु 15 वा हप्ता मिळण्या आधी शेतकऱ्यांना काही महत्वाची कामे करावी लागणार आहेत.अन्यथा शेतकऱ्यांना 15 व्या हप्त्यापासून वंचित राहावे लागु शकते.

केंद्र सरकार भारतातील शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी पीएम किसान सन्मान निधी योजनाया योजनेचा वापर करत आहे. या योजनेंतर्गत पात्र शेतकर्‍यांना शेतीतील कामे करण्यासाठीजसे कि खत, बी-बियाणे मशागत करण्यासाठी दरवर्षी 6,000 रुपये दिले जात आहेत. अलीकडेच, सरकारने पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 15 वा हप्ता जमा केला आहे. 2023 ज्या शेतकऱ्यांची केवायसी झाली आहे, त्याच शेतकऱ्याच्या खात्यात हप्त्याची रक्कमजमा केली जाणार आहे, असा निर्णय घेण्यात आला आहे. जर एखाद्या शेतकऱ्याच्या बँक खात्यात पैसे आले नाहीत, तर त्यांनी आधी त्याचे केवायसी करून घेणे आवश्यक आहे. त्या मुळे सर्व शेतकऱ्यांनी आपला हप्ता वेळेत आपल्या खात्यात जमा होण्यासाठी KYC करून घेणे आवश्यक आहे.

त्यामुळे लवकरात लवकर जवळच्या ऑनलाईन सेंटर किंवा बँके मध्ये जाऊन आपल्या खात्याची KYC करणे बंधनकारक आहे. आज या लेखात आपण प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहे.

PM kisan योजनेची नोंदणी करताना या चुका टाळा

pm kisan योजनेची नोंदणी करताना शेतकऱ्यांना अथवा नोंदणी करणाऱ्या व्यक्तीने काही चुका करता कामा नये अन्यथा आपला हप्ता जमा होणार नाही याची काळजी शेतकऱ्यांनी घेतली पाहिजे. चूकीची माहिती देऊ नका अन्यथा तुम्ही या योजनेच्या लाभापासून वंचित राहू शकता. त्यात तुमचे नाव, लिंग, आधार, पत्ता, मोबाईल नंबर, बँक खाते क्रमांक इत्यादी माहिती व्यवस्थित द्या.

E-KYC लवकर करून घ्या अन्यथा मिळणार नाही हप्ता

तुम्ही इ-केवायसी केली नसेल तर मग ती लवकर करून घ्या. ई-केवायसी लवकर नाही केल्यास तुम्हचा हप्ता अडकू शकतो. नियमानुसार योजनेशी संबंधित प्रत्येक लाभार्थी साठी KYC आवश्यक आहे. तुम्ही अधिकृत पोर्टलवर pmkisan.gov.in वर जाऊन किंवा तुमच्या जवळच्या csc केंद्रावर जाऊन, किंवा तुमच्या बॅंकेत जाऊन e-kyc करून घेऊ शकता.

दंडात्मक कारवाई

दरम्यान pm kisan sanman nidhi च्या चुकीच्या पद्धतीने लाभ घेणार्याविरोधात सरकारने कारवाई तीव्र केल्याची बातमी समोर येत आहे. सरकार आता जमिनीच्या नोंदीची पडताळणी दरम्यान पंतप्रधान किसान योजनेचा लाभ घेतलेल्या अपात्र लोकांकडून पैसे काढण्याची प्रक्रिया वेगवान करण्यात आली आहे. पैसे परत न झाल्यास अशा लोकांवर कारवाई करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

अडचण आल्यास येथे करा संपर्क

pm kisan sanman yojane संबधी कोणतीही अडचण आल्यास शेतकरी pmkisan-ict@gov.in या ईमेल आयडी वर संपर्क करू शकता. तुम्ही pm kisan चा हेल्पलाईन नंबर 155261 किंवा 1800115526 टोल फ्री क्रमांक किंवा 011-23381092 वर संपर्क साधू शकता. किंवा पीएम-किसान हेल्पलाइन नंबर 011-24300606 आपली तक्रार धाकल करू शकता.

सरकार निधी वाढवण्याच्या विचारात

2024 च्या लोकसभा निवडणुकीपुर्वी सरकार (farmar) शेतकऱ्यांसाठी (Modi Governments) मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. विविध योजनांच्या माध्यमातून मोदी सरकार शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्याची शक्यता आहे.पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या PM Kisan Samman Nidhi Yojana रक्कमेत वाढ करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या रक्कमेत वाढ करून महागाईने हायरण झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न सरकार करणार आहे. सरकार या रक्कमेत वाढ करून 6000 च्या ऐवजी 8000 रु करण्याचा विचार करत आहे.

तुम्हाला जर आमची माहिती आवडली असेल व अश्या प्रकारच्या माहिती आपणाला हवी तर आमच्या तरुण विचार या व्हाट्सअप्प चॅनल व फेसबुक पेज ला नक्की follow, लाईक नक्की करा.

Leave a Comment