महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट, यात आपल्या तालुक्याचे नाव आहे का ? हे तपासा 2023 Drought in Maharashtra 2023

दुष्काळ म्हणजे काय ?

दुष्काळ म्हणजे काय ? हे आपणाला माहित आहेच परंतु त्याची भीषणता सर्वानी अनुभवलेली नसते किंवा नाही. पण 1973 मध्ये दुष्काळाच्या झळा बऱ्याच भागात बऱ्याच नागरिकांनी याचा अनुभव घेतला आहे. पाण्याची आणि अन्नाची टंचाई खूप मोठ्या प्रमाणात जाणवते. माणसांना व प्राण्यांना पाण्याची व अन्नस्रोतांची कमतरता किंवा तीव्रता उणीव जाणवते. यासाठी मानव मोठ्या प्रमाणात जबाबदार असू शकतो. दुष्काळात अन्नपाण्याच्या अभावामुळे माणसांसह बहुसंख्य सजीवांना प्राणसंकटास तोंड द्यावे लागते. जेथे दुष्काळ पडतो, त्या ठिकाणची उत्पादकता कमी होते. लोकांच्या आर्थिक जीवनमान खालावते . प्राणी,माणसे वृक्ष सजीव या सर्वांच्या आयुष्यात याचा खूप मोठा परिणाम होतो. तेथे जीवन पूर्ववत होण्यास, अनेक वर्षे लागू शकतात.

लातूरचे उदाहरण

2016 मध्ये लातूर जिल्यात अश्याच परंतु माध्यम सुरुपाच्या दुष्काळाच्या झळा जाणवल्या होत्या. त्या काळात लातूर शहराला पिण्या साठी पाणी सुद्धा पुरेशे नव्हते. त्या काळात मोदी सरकार मध्ये रेल्वे मंत्री असणारे सुरेश प्रभू याना खास लातूर साठी मिरज शहरातून लातूर ला रेल्वने पाणी पोहचवण्याची सुविधा केली. महानगरपालिका असलेल्या शहरालासुद्धा आगगाडीने पाणी आणावे लागले. धरणांचे मोठे प्रकल्प बनवून त्यावर अधारीत सिंचन करून पाण्याचा प्रश्न सोडवला जातो. परंतु या प्रकल्पांना अनेक मर्यादा असतात. त्यामुळे दुष्काळ खूप गंभीर आणि तीव्र स्वरूपाचा असतो. या वर सर्वानी योग्य नियोजन करून मात करणे गरजेचे असते.

महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट/ महाराष्ट्रातील 42 तालुक्यात दुष्काळ

यंदा पावसाने राज्यातील सर्वच भागांमध्ये उशिराने हजेरी लावली, परंतु शेतकऱ्यांना अशी अपेक्षा होती की, यावर्षी गेल्यावर्षी प्रमाणे जोरदार पाऊस पडेल. त्यामुळे शेतकऱ्याच्या स्थितीमध्ये सुधारणा होईल.

परंतु यंदा राज्यात अल निनोच्या प्रभावामुळे सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. त्यामुळे महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट आले. महाराष्ट्रातील 42 तालुके दुष्काळाच्या छायेत असून या तालुक्यांचे अंतिम सर्वेक्षण होणार आहे. स्थानिक प्रशासनाने महा मदत मोबाईल ॲपच्या माध्यमातून सर्वेक्षण करून सर्व तालुक्यातील स्थितीचा अहवाल 17 ऑक्टोबर पर्यंत, दुष्काळ देखरेख समितीमार्फत राज्य शासनाला सादर करावा. अशा सूचना सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना राज्य शासनाने दिल्या आहेत. राज्यात एक जून ते 26 ऑगस्ट या काळात सरासरी 772.4 मी पाऊस पडतो. मात्र यंदा प्रत्यक्षात 709.5 एम. एम. म्हणजे सरासरी पेक्षा आठ टक्के कमी पाऊस झाला आहे. त्यात मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा 21 टक्के, कमी असून मराठवाड्यात 18%, तर विदर्भ सरासरीपेक्षा 9%, कमी पावसाची नोंद झाली आहे. मराठवाड्यातील नांदेड वगळता सर्व जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. औरंगाबाद मध्ये 33%, बीडमध्ये 32%, हिंगोली 34%, जालन्यात 48%, लातूर 8%, धाराशिव 23 %, आणि परभणीत 25 %, कमी पाऊस झाला आहे. याचा परिणाम खरीप हंगामातील उत्पादनांवर झाला आहे.

राज्याच्या महसूल विभागामार्फत महामदत मोबाईल ॲप द्वारे दुष्काळाचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यामध्ये राज्यातील 15 जिल्ह्यांमधील 42 तालुके दुष्काळाच्या निकषात बसतात. त्यामुळे दुष्काळी स्थिती असलेल्या तालुक्यांमध्ये दुष्काळ आहे, किंवा कसे असल्यास तीव्रता किती आहे. तो कोणत्या प्रकारात मोडतो, याचा अहवाल 17 ऑक्टोबर पर्यंत महाराष्ट्र शासनाला सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मराठवाड्यातील 14 तालुके दुष्काळाच्या छायेत

मराठवाड्यातील 14 तालुके दुष्काळाच्या छायेत असून त्यात जालना जिल्ह्यातील पाच, बीड आणि धाराशिव जिल्ह्यातील प्रत्येकी तीन,, छत्रपती संभाजी नगर मधील दोन, तर लातूर जिल्ह्यातील एक, तालुक्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे नांदेड जिल्ह्यातील एकाही तालुक्याचा यात समावेश नाही.

पश्चिम महाराष्ट्रातील 20 तालुके दुष्काळाच्या छायेत

राज्यातील एकूण 42 तालुक्यांपैकी तब्बल 20 तालुके हे पश्चिम महाराष्ट्रातील आहेत. पण त्यात पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक सात तालुक्यांचा समावेश आहे. त्या पाठो-पाठ सोलापूर मधील पाच, सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येकी दोन तालुक्यांमध्ये दुष्काळ आहे. असे या सर्वेक्षणात आढळले आहे.

कोणते 42 तालुके दुष्काळग्रस्त आहेत कुठला

नंदुरबार, सिंदखेड, चाळीसगाव, बुलढाणा, लोणार, भोकरदन, जालना, बदनापूर, अंबड, मंठा, संभाजीनगर, सोयगाव, मालेगाव, सिन्नर, येवला, शिरूर, घोडनदी, मुळशी, दौंड, पुरंदर, वेल्ला, बारामती, इंदापूर, वडवणी, धारूर, आंबेजोगाई, रेनापुर, वाशी, धाराशिव, लोहारा, करमाळा, माढा, बार्शी, माळशिरस, सांगोला, वाई, खंडाळा, हातकणंगले, गडहिंग्लज, शिराळा, खानापूर, कडेगाव, मिरज, विटा, या तालुक्यांमध्ये दुष्काळ जन्य स्थिती आहे.

तुम्हाला जर आमची माहिती आवडली असेल व अश्या प्रकारच्या माहिती आपणाला हवी तर आमच्या तरुण विचार या व्हाट्सअप्प चॅनल व फेसबुक पेज ला नक्की follow, लाईक नक्की करा

Leave a Comment