यंदा 1972 नंतरची सर्वात मोठी पाणीटंचाई Water shortage
Water shortage गेल्या पन्नास वर्षात सुमारे तीन वेळा कमी पावसामुळे पाणी तुटीचा सामना करा. राज्याला करावा लागला मात्र मागील तीन म्हणजेच 1972, 2012 आणि यंदाचे 2023 या पाणी तुटीच्या वर्षापैकी 2023 ची पाणी स्थिती सर्वात गंभीर आहे. यंदा परतीच्या पावसाने दगा दिला, तर मात्र ही Water shortage पाणी तूट 1972 आणि 2012 यापेक्षा मोठी ठरू शकते. अनेक अहवालाचा अभ्यास केल्यानंतर असे लक्षात येते की, दर सात ते दहा वर्षांनी मोठा दुष्काळ राज्यात येतो. यासाठी पाण्याचे नियोजन करणे राज्य शासनाच्या हाती आहे असे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्रात स्वातंत्र्यपूर्व काळापासून अनेक वेळा पाणी तुटीचा Water shortage सामना करावा लागला नागरिकांना आता याची सवय झाली आहे. कारण अशी परिस्थिती येण्याची पहिली वेळ नाही. राज्य शासनाने अनेक अभ्यास गट व समित्या याबाबत नेमल्या याचा अभ्यास केला. असता पाऊस कमी पडत आहे. हाच निष्कर्ष निघतो आहे 1972 ते 73 या कालावधीतील दुष्काळ सर्वात गंभीर समजला जातो. कारण त्यावेळी अन्नाचा तुटवडा देखील निर्माण होतो. यावर “सुखटनकर समितीचा अहवाल” प्रसिद्ध आहे. या अहवालानुसार राज्यात दर सात ते दहा वर्षांनी मोठी पाणी तुटीची वेळ येत असते. स्थानिक स्वरूपाचे दुष्काळ दर दोन ते तीन वर्षांनी येतच असतात आज पर्यंत त्यामध्ये फारसा बदल झालेला नाही.
अलीकडच्या काळातील पाणीतुटीचे हॉटस्पॉट
स्वातंत्र्यानंतर छत्रपती संभाजीनगर, जालना, लातूर, धाराशिव, पुणे, नाशिक, नांदेड हे पाणी तुटीचे Water shortage हॉटस्पॉट बनले आहेत. तर कोल्हापूर, सांगली व काही प्रमाणात पुणे हे ओल्या दुष्काळाचे हॉटस्पॉट गेल्या दहा वर्षात झालेले आहेत. पुणे शहरात सांडपाणी व्यवस्थापन नीट नसल्याने पुराचे पाणी रस्त्यावर येते त्यामुळे मुसळधार पाऊस झाला, तरीही शहरात पूरस्थिती वारंवार उद्भवत आहे.
पन्नास वर्षात सर्वात मोठी तूट.
“एनर्जी एन्व्हायरमेंट अँड वॉटर” या संस्थेच्या अहवालानुसार राज्यात 50 वर्षात पाणी तुटीच्या Water shortage घटनांमध्ये सात पटीने वाढ झाली. असून पूरस्थितीच्या घटनेत सहा पटीने वाढ झाली. 1970 ते 2019 पर्यंतचे मूल्यांकन या समितीने केले, असता राज्यात या कालावधीत 78.41 दशलक्ष नागरिकांना पाणी तुटीचा तर 1023 दशलक्ष नागरिकांना पूरस्थितीचा सामना करावा लागला आहे.
“महाराष्ट्राने स्वतंत्र पूर्व काळापासून दुष्काळ पाहिले आहेत. 1972 ते 78 पर्यंत ची परिस्थिती वेगळी होती, कारण तेव्हा जलसंपदा योजनेचा विस्तार मोठ्या प्रमाणावर नव्हता. आता मात्र राज्यात देशात सर्वाधिक धरणे झालेली असतानाही वारंवार Water shortage दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. याचे कारण पाणी नियोजन व्यवस्थित होत नाही आपल्याकडे पाऊस दुष्काळ दुष्काळातही पाणी पुरेल एवढा पडला आहे. पण त्याचे व्यवस्थापन नीट होत नाही आता पीक पद्धतीत बदल करण्याशिवाय पर्याय नाही.”
प्राध्यापक एच.एम.देसरडा.
माजी सदस्य राज्य नियोजन समिती
यंदाची पाणी तूट सर्वात मोठी ठरू शकते.
पाणी तुटीच्या अनेक अहवालांचा अभ्यास केला असता, असे लक्षात येते की 1972 मध्ये धरणाची कमतरता असल्याने पाणी साठ्याची अडचण झाली. त्यामुळे अन्नाचा तुटवडा जाणवला त्यानंतर पाठोपाठ काही, वर्ष पाणी तुटीचा सामना करावा लागला. तो 1991 पर्यंत 1972 सोबत 2012 व त्यानंतर थेट 2023 ची तुलना तज्ञांनी केली आहे. यंदाची जीवन ते ऑगस्टपर्यंतची पाणी तूट सर्वच जिल्ह्यात मोठी आहे. मात्र अजून सप्टेंबर व ऑक्टोबर चे काही दिवस शिल्लक आहेत. या 30 ते 35 दिवसात पाऊस झाला नाही. तर यंदा 1972 पेक्षा मोठी पाणी तूट Water shortage असा अंदाज काही तज्ञांनी व्यक्त केला आहे.
त्यासाठी आपणासर्वांना या सर्व गोष्टीचा विचार करून त्यावर योग्य त्या उपाय योजना कराव्या लागतील.
ऑगस्ट 2023 अखेर पाणी तूट टक्के.
नगर : 36,बीड : 36, पुणे : 17, लातूर : 15, सोलापूर : 31, धाराशिव : 27, सातारा : 46, सांगली : 46, अकोला : 33, छत्रपती संभाजीनगर : 35, धुळे : 27, जळगाव : 18, जालना : 49, परभणी:29. (सर्वाधिक)
तुम्हाला जर आमची माहिती आवडली असेल व अश्या प्रकारच्या माहिती आपणाला हवी तर आमच्या तरुण विचार या व्हाट्सअप्प चॅनल व फेसबुक पेज ला नक्की follow, लाईक नक्की करा